पुष्पगुच्छ नको, शैक्षणिक साहित्य द्या — जिल्हा परिषद CEO मीनल करणवाल यांचं आवाहन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सामाजिक भान जपत एक स्तुत्य आणि विधायक पाऊल उचललं आहे. जिल्हा परिषदेमध्ये भेटीस येणाऱ्या अथवा शुभेच्छा देणाऱ्यांसाठी त्यांनी एक आगळंवेगळं आवाहन केलं आहे — पुष्पगुच्छ नकोत, शैक्षणिक साहित्य द्या
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल म्हणाल्या, आपल्या भेटीच्या क्षणी दिले जाणारे फुलांचे गुच्छ काही वेळाने वाळतात, पण एखादी नोटबुक, पेन, किंवा शालेय साहित्य एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. विशेषतः मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या वस्तूंची मोठी गरज असते. अशा विद्यार्थ्यांना हे साहित्य दिल्यास ते अधिक आनंदी होतील आणि तेच आपल्या समाजाचं उज्वल भविष्य घडवतील.
या उपक्रमाला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रशासनात एक नवा आदर्श निर्माण होतो आहे. भेटीसाठी येणारे नागरिक, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आता शैक्षणिक साहित्य घेऊन जिल्हा परिषदेत दाखल होत आहेत.
ही संकल्पना प्रशासनाच्या संवेदनशीलतेचं प्रतीक ठरत असून, अन्य शासकीय कार्यालयांनीही या उपक्रमाचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
शब्दांनी नव्हे, कृतीतून परिवर्तन घडवा — मीनल करणवाल यांचा हा संदेश निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा