जामनेरात वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पोलिस निरीक्षक रस्त्यावर; नागरिकांचे कौतुक, प्रशासनाकडे तीव्र नाराजी - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पोलिस निरीक्षक रस्त्यावर; नागरिकांचे कौतुक, प्रशासनाकडे तीव्र नाराजी

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर शहरातील भुसावळ चौफुली परिसरात शुक्रवारी ६ जून रोजी सकाळी झालेल्या तासभराच्या वाहतूक कोंडीने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. यावेळी जामनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर कासार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दृश्य नागरिकांना पाहायला मिळाले. त्यांच्यासोबत भगवान पाटील हेही वाहतूक नियंत्रणासाठी तत्परतेने उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांचे रस्त्यावर उभे राहून वाहने मार्गावर लावणे, वाहनचालकांना समजावणे आणि शिस्त राखण्याचे प्रयत्न उल्लेखनीय ठरले. त्यांच्या या कर्तव्यपरायणतेचे नागरिकांनी खुलेआम कौतुक केले.

मात्र दुसरीकडे, या वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. “रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेवर हे काम पूर्ण केले असते, तर आज ही वेळ आली नसती. आमची सहनशक्ती संपत चालली आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाल्या.

शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंड्या आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिक आता अधिक तीव्रपणे आवाज उठवू लागले आहेत. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच वाहनांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी, अशी मागणीही वेगाने पुढे येत आहे.



Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads