पळासखेडा मिराचे मंत्री गिरीश महाजन यांची भेट पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीची पाहणी, तात्काळ मदतीचे आदेश
जामनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गावर मोठे संकट कोसळले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून उदरनिर्वाहाचा आधारच संकटात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज पळासखेडा (मि.) येथे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत मंत्री महाजन यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, पंचनामे तत्काळ पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. या संकटसमयी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.शेतकऱ्यांनी थेट मंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली असता, मंत्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरूनच निर्देश देत कामाची गती वाढवण्याचे आदेश दिले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा