महाराष्ट्र
माजी मंत्री गिरीष महाजनांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना यांना चाळीसगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी संदर्भात फोनवरून केली चर्चा ...
जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे
अतिवृष्टीमुळे सुमारे 20 गावांना पुराच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.
या नुकसानग्रस्त गावांची माजी मंत्री गिरीष गिरीष महाजन यांनी पाहणी केली.
चाळीसगाव तालुक्यातील काही नागरिक बेपत्ता असून, पुराच्या पाण्यामुळे जीवितहानी झाल्याची दुर्दैवी शक्यता आहे.
शेकडोंच्या संख्येने पशुधन वाहून गेले आहे. शेतजमिनींचे - पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांचे, संसारोपयोगी साहित्याचे, वाहनांचे नुकसान झाले असून मोठी वित्त हानी झाली आहे.
मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व मा. विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस माजी मंत्री गिरीष महाजनांनी संपर्क साधून सदर भयावह परिस्थितीची सविस्तर माहिती दिली.
मा. मुख्यमंत्री महोदयांशी बोलतांना, शासनस्तरावर जलद मदत मिळावी व त्वरित पंचनामे करण्यात यावे ही मागणी केली, तसेच येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत आपदाग्रस्तांच्या मदतीसाठी त्वरित निर्णय घेण्यात यावा अशी माजी मंत्री गिरीष महाजनांनी विनंती केली
यावेळी मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पालकमंत्री मा.ना. गुलाबरावजी पाटील, खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा