राजकीय
सेवा सप्ताहच्या माध्यमातून प्रहार सोलापूरच्यावतीने शासकीय विश्रामगृहाच्या ५० कर्मचाऱ्यांना अन्नधान्याचे वाटप
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनीधी :-
सोलापूर : महाराष्ट्राचे राज्यमंत्री लोकनायक बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताह च्या माध्यमातून प्रहार सोलापूरच्या वतीने सोलापूर विश्रामगृहातील जवळजवळ पन्नास शिपायांना कर्मचाऱ्यांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले अख्या महाराष्ट्रातून सोलापुरात येणाऱ्या नेतेमंडळी ची तजवीज करणाऱ्या विश्रामगृहाच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे प्रहार संघटनेकडून नेहमीच कौतुक होत असते आणि आज भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अन्नधान्याचे किट वाटप करत आम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळत आहे तसेच शहर प्रमुख अजित भाऊ कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहर संपर्क प्रमुख जमीर शेख शहर कार्याध्यक्ष खालीद मणियार शहर उपाध्यक्ष माजित पटेल करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर मुदस्सर हुंडेकरी प्रहारचे अनेक प्रहार सैनिक उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा