महाराष्ट्र
प्रगतशील द्राक्ष बागायतदार बाळासाहेब नाना झांबरे- पाटील यांच्या बारा एकर क्षेत्राच्या शेततळ्याचे भुमिपूजन आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते संपन्न....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप): दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार बाळासाहेब नाना झांबरे -पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील पहिले असे बारा एकर क्षेत्रात उभारणाऱ्या भव्य शेततळ्याचे भूमिपूजन पार पडले.
या शेततळ्याचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारी मंत्री, दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाषराव देशमुख व व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर हविनळे , मंद्रूप चे अप्पर तहसीलदार सुजित नरहरे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे , उद्योगपती रमेश आसबे व बाळासाहेब नाना झांबरे- पाटील, राहुल झांबरे - पाटील, सचिन झांबरे-पाटील व पंचक्रोशीतील उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब नाना झांबरे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार सुभाष देशमुख बोलताना म्हणाले की, बाळासाहेब नाना झांबरे -पाटील यांनी आपल्या कष्ट, नियोजन आणि प्रयोगशीलतेच्या बळावर नाविन्यपूर्ण शेती करत मोठे यश मिळवले असून, त्यांच्या अनोख्या प्रयोगामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे. प्रत्येक व्यवसायात अडचणी येतात पण त्या अडचणींवर मात करत व्यवसाय यशस्वी करायचा असतो.झांबरे यांचा हा उपक्रम केवळ तालुक्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरेल. तसेच या उपक्रमाचे सर्व शेतकऱ्यांनी अनुकरण करावे असे मत यावेळी व्यक्त केले. तसेच एक गाव, एक पीक या संकल्पनेअंतर्गत अंत्रोळी हे गाव द्राक्ष उत्पादनात नावारूपास यावे यासाठी विशेष प्रयत्न करणार असून महाराष्ट्र शासनातर्फे सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन केले.
यावेळी पांडुरंग ताटे यानी आपल्या मनोगतातून बाळासाहेब नाना झांबरे पाटील यांना कृषी भुषण पुरस्कार मिळावा याबद्दल आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली.
या भूमिपूजन कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारी मंत्री, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाषराव देशमुख व व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर हविनळे , मंद्रूप चे अप्पर तहसीलदार सुजित नरहरे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, अंत्रोळीचे ग्राम महसूल अधिकारी एस. बी. कदम व कृषी सहाय्यक संतोष साठे, महसूल सेवक बसवंत सुतार, डाॅ. चनगोंडा अविनाश,उद्योगपती रमेश अण्णा आसबे, सुभाष पाटील, यतिन शहा, महादेव व्हनमाने, गजीनाथ शेजाळ , प्रभाकर बिराजदार, पांडुरंग ताटे, प्रमोद काका बाबर ,नामदेव गायकवाड, डॉक्टर बळीराम गायकवाड , हनुमंत गायकवाड, ब्रम्हदेव सलगरे, गणपत कुंभार, पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच ,सदस्य व यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कोकरे यांनी केले तर प्रास्ताविक पांडुरंग ताटे यांनी केले.
🔴शेतीचा विकास करत असताना सर्वात महत्वाचा विषय म्हणजे पाणी सर्वाना अस वाटतय की, सरकारने सर्व काही कराव जे हे आज सर्व क्षेत्र वाढले आहे ते शेततळयामुळेच प्रत्येक शेतकर्यांनी शेती करत असताना पहिले तरतुद हि पाण्याची केली पाहिजे पावसाळयात जे पाणी वाहून जात वाया जाते त्या वाहुन जाणार्या पाणयाला अडवून साठवले पाहिजे पुढे बोलताना म्हणाले की, पावसाळयात नदीला भरपुर पाणी असते ते वाहुन जाते ते पाणी जर कॅनाल ला सोडले तर ते पाणी वाहत जाईल व ते मुरेल व बोअरवेल व विहिरींना पाणी वाढेल व ज्यांना तळे किंवा विहिर भरून घ्यायचे असतील ते भरून घेतील यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही व शेतकर्यांना फायदा होईल . :- प्रगतशील द्राक्ष बागायतदार बाळासाहेब नाना झांबरे पाटील
Previous article
This Is The Newest Post
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा