महाराष्ट्र
राळेगाव प्रभाग क्र.१६ मधील साई नगर येथे पावसाचे पाणी साचून राहत असल्याने प्रभागातील नागरिक त्रस्त
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर
राळेगाव येथील प्रभाग क्र.१६ मधील रहवासी श्रीमती महानंदा प्रकाश कांबळे साई नगर रावेरी रोड राळेगांव त्यांचा घरा जवळ पाऊसाचे पाणी साचून राहतं असल्यामुळे रहदारिस अडथळा निर्माण झाला. वॉर्डातील सर्व रोड चे बांधकाम २०१९ मध्ये पूर्ण झाले परंतु श्री. भागवत चौधरी यांच्या घरा पासुन ते कांबळे यांच्या घरा पर्यंत चा २५ मी. रोड नगर पंचायत राळेगांव ने सोडलेला आहे. त्यामुळे त्यांना येण्याजाण्याचा त्रास होत आहेत. त्यांच्या घरा समोर पाऊसाचे संपूर्ण पाणी साचून राहते. तसेच त्यांना त्या दुर्गंधी साचलेल्या पाण्याचा डबक्यातून येजा करावं लागते. त्यापासून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहेत. त्यातच त्यांचे शेजारी श्री.भागवत चौधरी यांनी शेतातील टाकाऊ माती रोडच्या बाजूला ढीग मारून टाकली त्यामुळे जास्तीच पाणी साचून राहते याविषयाची तक्रार नगर पंचायत राळेगांव दि.१५-०६-२०२१ ला तक्रार दिलेली असूनही नगर पंचायतीचे कर्मचाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही.तरी लवकरात लवकर पाण्याचा बधोबस्त करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा