दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२
मी... साईक्षा विठ्ठल केळजी
सहभाग घेतला असून आपण माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...
स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views यावर अवलंबून आहे...
आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....
स्पर्धेची बक्षिसे :-
प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त
द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त
तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त
चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त
पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त
सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी
अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी
तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.
प्रवेश फी :- १५० रुपये फक्त
Whatsapp क्रमांक :- 8007613469
आपला नम्र
साईक्षा विठ्ठल केळजी
निबंधाचा विषय : राष्ट्रपिता महात्मा गांधी
झाली जरी राख त्या चंदनी देहाची,
विझली जरी दिव्य ज्योत श्वासांची,
तरी आजही जग गाई थोरवी तुमच्या कार्याची...
सत्यास मानूनी ईश्वर, अहिंसेस बनविले साधन,
इथला कणकण करी गांधीजी तुम्हां नमन...
आपल्या भारतभूमीस पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक स्री-पुरुषांनी आपले आयुष्य राष्ट्राला अर्पण केले. म्हणून च आपली भारतभूमी म्हणजे रत्नांची खाणच आहे..! या खाणीतून साकारलेला कोहिनूर म्हणजेच महात्मा गांधीजी होय. याच महात्मा गांधीजींच्या कार्याला शब्दबद्ध करण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करतेय.
मानवतेचा मानदंड महात्मा गांधी यांची एका शब्दात ओळख करून द्यायची झाली, तर त्यासाठी समर्पक शब्द आहे 'महामानव'. कोणत्याही महान गोष्टीच मोजमाप करण्यासाठी वापरला जाणारा मानदंड म्हणजे 'गांधीजी' होय... मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा म्हटल जात. ते एक चतुर राजसेनानी होते. परकीय सत्तांच्या वेढ्यातून भारताला मुक्त करण्यासाठी लढले आणि करोडो भारतीयांच्या हक्कांसाठी आवाज उठविला. अहिंसा या त्यांच्या तत्वाचा आजही अखंड विश्व सन्मान करतेय.
तर जाणून घेऊया की, अहिंसा आणि शांती चे हे पुजारी, जे स्वतः एका श्रीमंत घराण्याची जोडलेले होते. जे स्वतः त्यांच्या किशोर अवस्थेत काही वाईट सवयींना बळी पडले होते, ते कसे काय या असंख्य भारतवासीयांचा आधारस्तंभ बनले..!
२ ऑक्टोबर १८६९ मध्ये पोरबंदर येथे जन्म झाला. मोहनदास करमचंद गांधी यांचे वडील पोरबंदर येथील राजाच्या दरबारी दिवाण होते. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी कस्तुरबां सोबत त्यांची लग्नगाठ बांधली गेली. त्यावेळी काही वाईट सवयींना गांधीजी बळी पडले होते. पण तरीही त्या वयातही त्यांना स्वतः मध्ये बदल करण्याची इच्छा होती, आणि हे मला महत्त्वाच वाटत. कारण आपण सर्वच चुकतो आपल्या आयुष्यात पण ना त्या चुका सुधारून स्वतः मध्ये बदल करण्याची प्रवृत्ती काहीजणांची च असते. आणि खरच गांधीजी त्यांच्या नजरेत जी गोष्ट चूक होती, त्यासाठी स्वतः ला प्रायश्चित्त करून घ्यायचे. हे सगळं त्यांनी स्वतः मान्य केलय त्यांच्या 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकात...
ही गोष्ट तेव्हांची आहे जेव्हा गांधीजींचे वडील शेवटच्या घटका मोजत होते. पण त्यावेळी गांधीजी त्यांच्या वडिलांना त्या अवस्थेत सोडून स्वतः च्या पत्नीकडे निघून गेले होते, आणि त्याचक्षणी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. शेवटच्या क्षणी ही गांधीजी तिथे नव्हते. त्याबद्दल गांधीजी म्हणतात, "मी माझ्या चुकीसाठी शर्मिंदा आहे आणि स्वतः ला खूप अभागी ही मानतो. मी वडिलांच्या खोलीच्या दिशेने धावताना हा विचार करत होतो की, जर वासना माझ्यावर हावी झाली नसती तर, माझ्या वडिलांनी माझ्या मांडीवरच अखेरचा श्वास घेतला असता." पित्याच्या मृत्यूनंतर मात्र गांधीजींच्या व्यवहारात खूप बदलाव आले. त्यानंतर ते कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन ला गेले. तेथील पश्चिमी वातावरणात ते रंगले. लंडन मध्ये चाललेल्या शाकाहारी आंदोलनात ते सहभागी झाले. त्याचवेळी लंडन मधील थिऑसॉफिकल सोसायटी कडून त्यांना त्यांच्या बालपणी मिळालेल्या हिंदू संस्काराकडे परत येण्याची प्रेरणा मिळाली, तेच संस्कार जे त्यांच्या आईने दिले होते.
कायद्याचे शिक्षण पूर्ण करून गांधीजी भारतात आले. भारतात वकिली करू लागले. पण ते आपली पहिलीच केस हारले. त्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेत एका केस संदर्भात गेले. तिथे ट्रेनच्या फस्ट क्लास डब्यातून प्रवास करताना त्यांना अपमानीत करण्यात आले. आणि हाच अपमान त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत भारतीयांच्या अधिकारासाठी लढताना सत्याग्रहाला शस्त्र बनविले. त्याचवेळी त्यांनी ब्रम्हचर्येचही व्रत घेतलं. त्यानंतर त्यांनी आपली पाळेमुळे घट्ट रोवून ठेवली भारतीयांच्या अधिकार संघर्षासाठी..!
दक्षिण आफ्रिकेत असंख्य पिडीतांना न्याय मिळवून देऊन ते विजेत्याच्या रुपात भारतात परतले. त्यानंतर संपूर्ण भारत भ्रमण केले. भारतीयांची दयनीय अवस्था बघून त्यांचा जीव हेलावून गेला. त्याचवेळी 'रौलट ॲक्टचा' ही त्यांनी विरोध केला. या ॲक्ट अंतर्गत 'विना चौकशी अटक' हा अधिकार त्यावेळच्या सरकारला मिळाला होता. गांधीजींच्या सहकार्याने सगळीकडे या ॲक्ट विरोधात उठाव झाले. त्यामुळे सभेवर जनरल डायरने केलेल्या गोळीबारात ४०० लोक मृत्यूमुखी पडले होते. या हत्याकांडानंतर गांधीजींना खात्री पटली की, आता भारतीय स्वातंत्र्यलढा प्रारंभ करायलाच हवा. इथूनच तर सर्व जगाला समजल ध्येयाने प्रेरीत होऊन सामान्य ते असामान्य व्यक्तीमत्व कस फुलू शकत..!
सामान्य ते असामान्य हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. वाढत्या प्रसिद्धीमुळे गांधीजी राष्ट्रीय काँग्रेसचा एक प्रमुख चेहरा बनले होते. गांधीजी कॉंग्रेस शी जोडले गेल्यानंतरच कॉंग्रेस तळागाळातील जनसमुदायापर्यंत पोहोचली. गांधीजींनी धार्मिक सहिष्णुता आणि सर्व धर्मांची आझादी या आधारावर स्वातंत्र्य मागितले. गांधीजींच्या विचारांनी प्रेरीत होऊन अखंड देश स्वातंत्र्यासाठी पेटून उठला. याचा परिणाम म्हणून गांधीजींना देशद्रोही ही ठरविण्यात आल होत. ब्रिटिश सरकारला गांधीजींच्या मागण्या व आंदोलनांना नजरअंदाज करण अशक्य झाल होत. त्यावेळी या विषयावर चर्चेसाठी गोलमेज परिषदेच आयोजन करण्यात आल होत. दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजी हजर होते. त्यांना शेळी च दूध पिण्याची सवय होती, म्हणून सोबत 'निर्मला' नावाची शेळी घेऊन गेले होते. गोलमेज परिषदेत गांधीजींनी आपली बाजू प्रभावी पणे मांडली पण तरीही पदरी निराशाच आली. पण तरीही थांबतील ते गांधीजी कुठले? त्यांनी अविरत लढे दिले, सत्याग्रह केले, उपोषणाला बसले, जिथे माणसे गमवावी लागली तिथ थांबले. पण भारतीय स्वातंत्र्याच स्वप्न तडीपार नेल आणि असंख्य भारतवासीयांच स्वातंत्र्य च स्वप्न १५ऑगस्ट १९४७ साली बहरुन आलं.
'बंधनांचे अडथळे करुनी पार, '
'स्वातंत्र्याचा गड केला सर...'
सगळीकडे स्वातंत्र्याचा उत्सव होता तर, भारत - पाकिस्तान फाळणीमुळे गांधीजींच अखंड एकजूट देशाच स्वप्न भंग पावल होतं... फाळणीमुळे अमानुष हिंसा पसरली आणि गांधीजी तिथे शांती प्रस्थापित करण्यासाठी जुटले. फाळणीनंतर काही मुस्लिमांनी पाकिस्तान मध्ये न जाता भारतातच वास्तव्य करण पसंत केल. गांधीजी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. याचाच व्देष म्हणून ३० जानेवारी १९४८ साली नथुराम गोडसे याने गांधीजींवर गोळ्या झाडल्या. 'अशाप्रकारे या भारतभूमीला अंधाराच्या गर्तेतून प्रकाशाच्या झरोक्यात नेणारा एक झंझावाती तारा कायमस्वरूपी शरीराने निद्रिस्त झाला... '
गांधीजींची थोरवी गाताना आईनस्टाईन म्हणाले होते की, "आणखी काही पिढ्यांनंतर लोकांचा विश्वास ही नाही बसणार की, असा कधी कुणी माणूस झाला होता. "
सद्यस्थितीत महात्मा गांधींबद्दल जितका आदरभाव आहे तितकाच त्यांच्या वागण्या बाबत, विचारांबद्दल राग, संताप नि व्देष ही आहे च काही जनसमुदाया मध्ये. बऱ्याचदा हे गैरसमजातून अधिक होत. तर इतिहासाबद्दल अपुर ज्ञान ही त्याला कारणीभूत ठरु शकत. वरकरणी इलाज नाही म्हणून महात्मा म्हणायच, पण काहींच्या मनात प्रचंड राग ही असतोच. अशांचे जे विचार असतात ना ते आपल्या लोकशाहीला नक्कीच धोकादायक असतात. गांधीना वंशवादी ठरविणे, ते ब्रिटिश धाजिर्णे होते, त्यांनी आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांसाठी काहीच केले नाही. गांधीनी कृष्णवर्णीयांना रांगडे, जंगली, काफीर म्हटले. हो, तस म्हटलं आहे. पण त्यांनी ते स्वानुभवातून म्हटलं होतं. जेव्हा गांधीजींना अट्टल गुन्हेगारां सोबत डांबल होत. तेव्हा ही लोक वाट्टेल ते खात, शिव्या देत, अंगावर येत. यामुळे तरुण गांधीजींनी तस म्हटलं होतं. पण 'बोअर युद्धात' त्यांनी काळ्यांची हलाखीची परिस्थिती जाणली होती. पण तरीही यांसारख्या अनेक मुद्द्यांवर आज गांधीजींची प्रतिमा मलिन केली जातेय. ही एखाद दुसरी घटना आहे, दुर्लक्षणिय वाटू शकते. पण गांधींच्या विचारांच्या धारकऱ्यांना ते नक्कीच योग्य नाही वाटत. कारण या खोट्या गोष्टींचा आधार घेऊन पुढच्या पिढ्या पण तसाच प्रसार करतील..! म्हणून च गांधी समजून घेताना त्यांचा सामान्य ते असामान्यापर्यंत चा प्रवास प्रत्येकाने जाणावा. स्वतः च पहिल मूल गमावल्यानंतर ही ते संपूर्ण राष्ट्राचे पिता झाले. खरतर हे आहे गांधीजींच खर कतृत्व...
शेवटी गांधीजीं कडे मी इतकच मागेन,
तुमच्या विचारांचे धडे द्या आम्हांस,
तुमच्या धैर्याच गुपीत सांगा आम्हांस...
तयाचे शौर्य गाजवू आम्ही,
एक सामान्य ते राष्ट्रपिता हा प्रवास जगी वर्तवू आम्ही...
👍👍👌
उत्तर द्याहटवाMast..Khupach chan..Angaver kata yenya sarkha Nibandh Lihila tu Saiksha...Ashich mothi ho ...God bless you...Tu nakki Jinkshil hya Exam madhe
उत्तर द्याहटवा👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा