महाराष्ट्र
सुधागड तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची सुरुवात
सुधागड /कोंडगाव (विशेष प्रतिनिधी ) राम तुपे
सुधागड तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. नैऋत्य मोसमी पावसाने अगदी दणक्यात तालुक्यात सुरुवात केली . त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.
पहिल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी भात पेरणी केली होती. पेरणी करून शेतकरी भात लावण्याच्या तयारीत होता पण अचानक वरुण राजाने पाठ फिरवल्यामुळे बळीराजा चिंतेत होता, लावणी चा प्रश्न ऐरणीवर असल्यामुळे बळीराजा पावसाची वाट पाहत होता.
पण गेल्या काही दिवसापासून दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे. आता पुन्हा एकदा शेतीची कामं सुरू केली आहेत. उन्हाने भाताची कोलमडलेली रोपे पुन्हा एकदा डौलाने उभी झालेली आहे. शेतकरी भात लावणी करताना दिसत आहे. मात्र मजुरांची कमतरता व मजुरांची वाढती मजुरी हा प्रश्न भेडसावत आहे. असे असले तरीही शेतकरी राजा भातशेतीची काम करण्यात मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा