स्पर्धक क्रमांक ००२१ : श्रद्धा रोहिदास पवळे पुणे - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००२१ : श्रद्धा रोहिदास पवळे पुणे

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... श्रद्धा रोहिदास पवळे

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी


तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

श्रद्धा रोहिदास पवळे


निबंधाचा विषय : स्वातंत्र्यपूर्व भारत व आधुनिक भारत 

             भारतभूमीला अखंड शौर्याचा इतिहास लाभला आहे. मौर्य ते मराठ्यांपर्यंतच्या मोघलांच्या जुलमी राजवटीत गुलामासारखं जगलेल्या जनमाणसाला स्वराज्याचे स्वप्न दाखवले छत्रपती शिवरायांनी आणि त्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर केले स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांनी आणि पुढे तोच वारसा जपला पेशव्यांनी. 

पूर्वीची भारतभूमी जणू सोन्याचे पाखरू होती. तारीख २४ ऑगस्ट १६०८ रोजी इंग्रज पहिल्यांदा व्यापारासाठी समुद्रमार्गे भारतात दाखल झाले आणि भारतात जणू कुरघोडींना सुरुवात झाली. एकोणिसाव्या शतकात 'फोडा आणि राज्य करा' या नीतीने इंग्रजांनी अखंड भारताचे तुकडे करायला सुरुवात केली. हळूहळू भारतातील स्वातंत्र्याचे पारतंत्र्यात रूपांतर होण्यास सुरुवात झाली. मूठभर इंग्रजांनी आपल्याच भूमीत येऊन आपल्यावर अधिराज्य गाजविण्यास सुरुवात केली. या स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात भारताची अवस्था जणू सोन्याच्या पाखराला पिंजऱ्यात कोंडून ठेवल्यासारखी झाली होती. या पाखराचे एखाद्याने अमानुषपणे पंख कुरतडावे तसे इंग्रज भारतीय जनतेचे आर्थिक शोषण करत होते. याच परिस्थितीत स्वातंत्र्याच्या शोधात पेटल्या राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग यांसारख्या ज्वलंत मशाली. याच मशालींनी पुढे जाऊन अखंड स्वातंत्र्याची ज्वाला भारतभर पेटवली. ही ज्वाला एवढी प्रलयकारी ठरली की त्यांनी इंग्रजांना भारत सोडून जाण्यास प्रवृत्त केले. जणू ते सोन्याचे पाखरू पिंजरा सोडून आकाशात भरारी घेऊन गेलं. स्वातंत्र्यानंतरचा भारत म्हणजे प्रगतीच्या वाटेवर चाललेला सुवर्णरथ जणू! 

                स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर ७३ वर्षांची वाटचाल झाली. त्या निमित्ताने भारतीय जनतेने 'काय कमावले' याचा ताळेबंद केला तर कमावलेल्या तराजूत साधन संपत्ती, पंचवार्षिक योजना यांच्या सहाय्याने भारताने आजपर्यंत केलेल्या प्रगतीचे माप टाकावेच लागेल. भारतात तयार झालेले शास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या महान व्यक्ती आणि सामाजिक बांधिलकी मानणारे विचारवंत यांनी निश्चितपणे भारताच्या प्रगतीत योगदान दिले आहे आणि भारताची देशाची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू झालेली आहे. परंतु स्वातंत्र्याबरोबरच कर्तव्याचेही बंधन असते, स्वतःच्या विकासापेक्षा राष्ट्रविकास महत्त्वाचा असतो हे आपण शिकलोच नाही. गुणात्मकतेला आणि वक्तशीरपणाला पर्याय नसतो, हे आपण सुबत्तेकडे वाटचाल करताना विसरूनच गेलो. जर आज आपल्याला, आपल्या भारत देशाला आधुनिकतेकडे वाटचाल करावयाची असेल, आधुनिक भारत निर्माण करावयाचा असेल तर चांगला बदल हा प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीमध्ये आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे.
             "संकटावर मात करून आभाळात झेपावणार आहे,
                पंखात बळ असेपर्यंत टक्कर देत राहणार आहे."
      आज आधुनिक काळात प्राचीन संस्कृतीचे वलय असणारा, संत महात्म्यांची भूमी असलेला, निसर्गाचे मुक्त वरदान लाभलेला आपला देश कुचेष्टेचा, अपमानाचा विषय बनला आहे. कारण आहे आपल्या मनातील संकुचित वृत्ती, अंगात भिनलेला आळस, कामाच्या दर्जाबाबतची उदासीनता आणि गुणात्मक विकासापेक्षा संख्यात्मक दिखाऊ विकासाकडे दिलेले लक्ष! उगवत्या पिढीच्या हातात या आधुनिक  भारताचे भवितव्य सोपावताना आजच्या तरुणांना प्रकाश देणाऱ्या सूर्याची, प्राण ओतणाऱ्या प्रकाशाची तर संजीवन देणाऱ्या जलाची भूमिका पार पाडावयाची आहे. त्यासाठी हवे धाडस आणि निर्धार! आधुनिक भारतात भ्रष्टाचाराच्या अंधारात सचोटीने वागणारे लोक आहेतच, त्याचा उपयोग आपण दीपस्तंभासारखे करायला हवा.
               "या जन्माचा नजराना मायभूमीस पेश व्हावा,
                 तिरंगाच माझा गणवेश व्हावा.
                 सांडावे रुधिर या मातृभूमीसाठी,
                 हरेक जन्मी भारत माझा देश व्हावा."
      भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. स्वातंत्र्यपूर्वी भारत अविकसित देशांमध्ये गणला जायचा; परंतु आधुनिक भारत विकसनशील देशांमध्ये अव्वल आहे. स्वातंत्र्यपूर्व भारत व आधुनिक भारत यांमध्ये एकच फरक आहे तो म्हणजे 'व' म्हणजेच भारताची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यापारिक आणि वैज्ञानिक अशा सर्वच स्तरांवर हा फरक लक्षात घेता येईल. स्वातंत्र्यपूर्व भारत हा इतिहासाने गौरवशील होता; तर आधुनिक भारत विज्ञानाने गतिशील आहे. स्वातंत्र्यपूर्वी भारतात राजे राज्यकर्ते होते; तर आधुनिक भारतात सत्ता जनतेच्या हाती आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतात व आधुनिक भारत यांमध्ये एकाच गोष्टीचे साम्य आहे ते म्हणजे 'एकता '.
        "देश विविध रंगांचा, देश विविध रंगांचा,
         देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा."
      स्वातंत्र्यपूर्व भारतात समाजावर जाचक रूढी -परंपरांचा पगडा होता; तर आज आधुनिक भारतात त्याच परंपरांवर कायदे करून बंदी घालण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ, बालविवाह, सती जाणे. स्वातंत्र्यापूर्वी भारतात अंधश्रद्धा आनंदात नांदायची. आता त्याच भारतात मोठे मोठे संशोधन केंद्रे उभी राहिली आहेत. भारताचे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची परिस्थिती लक्षात घेता आपला देश गरिबी, दारिद्र्य, हाल-अपेष्टा सहन करत होता तर आज आधुनिक काळात त्याचा सामना करत प्रगतीकडे वाटचाल करत आहे. स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली या हिशोबाला आता अर्थ नाही. स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांचा भ्रमाचा भोपळा राहिलेला आहे. जास्त लोकसंख्येचा देश, अज्ञान, दारिद्र्य, बेकारी, महागाई, अंधश्रद्धा, रूढी, शोषण, अन्याय, अत्याचार ,फसवणूक, संताप या सर्व मानवी भावभावनांचे गेल्या ७३ वर्षात जपणूक करीत हा देश आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७३ वर्षांनी मागे वळून पाहता ते राष्ट्रभक्तीने भारलेले अभूतपूर्व वातावरण नजरेसमोर येते, सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून स्वातंत्र्य मिळाले; परंतु त्यावेळी असलेले राष्ट्रप्रेमाचे वातावरण आधुनिक भारतात लयाला गेलेले दिसत आहे. त्यामुळे शक्तिशाली राष्ट्र म्हणून उभे राहताना अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. राष्ट्रप्रेम आणि चारित्र्य या गोष्टी कमी होत असल्याने अधोगतीची भीती वाटत असली तरी बहुतेक क्षेत्रात भारताची प्रगती होत असल्याने निराशेला आशेची चमक किनारही दिसत आहे. महासत्ता म्हणून जगात नाव मिळवताना पुन्हा एकदा प्रखर राष्ट्रप्रेम निर्माण होण्याची आवश्यकता आहे. ज्ञान, श्रम आणि नैतिकता या शक्तींचा भक्कम पायांवर परिवर्तनाची चळवळ आपण करू शकलो तरच भारतीय लोकशाहीचा भविष्यकाळ आधुनिक भारत उज्ज्वल होऊ शकेल. अन्यथा भ्रष्टाचार, हिंसाचार, अत्याचार व अनाचार या चार चांडाळ चौकटीच्या आवर्तात सापडून आधुनिक भारत अध:पतनाच्या गर्तेत गाडला जाईल. आपल्या देशात विचारवंतांची कमी कधीच नव्हती आणि आजही नाही. कमी आहे ती भोंगळपणा सोडून जनकल्याणाच्या योजना प्रत्यक्षात राबविण्याऱ्याची व पोटतिडकीने कृती करणाऱ्यांची.
        भारत देश आज चंद्रावर जाऊन पोहोचला. तेथे त्याने आपला तिरंगा फडकविला. त्याच्या विचारांना विमानांचे पंख भेटले. पायांच्या गतीला मेट्रोच्या गतीने मागे सोडलेले. कलाम नावाच्या क्षेपणास्त्राने भारतीयांच्या मनात जागा मिळवल्यापासून पृथ्वी आकाश एक झाले. विकासाची अग्नि त्रिशूल व नागाच्या सौंदर्यासह या भारतभूमीवर पसरून गेली आणि या भारताचे कालचक्र फिरू लागलं. स्वातंत्र्यपूर्व भारत म्हणजे भारताचा भूतकाळ हा गौरवशील होता. आधुनिक भारत म्हणजे भारताचे वर्तमान काळ हा गतिशील आहे. महासत्ता भारत म्हणजे भारताचा भविष्यकाळात उज्ज्वल असणार आहे.
Previous article
Next article

103 Comments to

  1. छान मांडणी केली आह़े दोन्ही बाजूंची. स्पर्धेसाठी शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कुच्छ किये बिना जय जय कार नही होती.
      कोशिश करने वालों की कभी हार नही होती.
      Nice little champ.

      हटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. Excellent ☺️keep it up��.. keep going and keep shine always

    उत्तर द्याहटवा
  4. As always you are rocking in everything.. one of the deepest and most beautiful essay I've yet read

    उत्तर द्याहटवा
  5. it's very impressive. This kind of information and writing is really essential to reach the people. These young thoughts of the young generation will surely make people think about the current as well as earlier situation. one of the best essay i have read ever. Must get the price.

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान,अतिशय सुंदर विचाराची मांडणी केली आहे..

    उत्तर द्याहटवा
  7. खूप छान आणि मुद्देसूद मांडणी... keep it up...👍

    उत्तर द्याहटवा
  8. Nowadays , people bacame to much buzy in their work,they forgot their responsibilities ,patriotism towards nation .... Really it's very necessary to alert the peoples mindset towards nation...your impressive words n art of writing made positive contribution among people...Best essay !
    Have gud luck!

    उत्तर द्याहटवा
  9. What was India like before and what is India like now. This essay has been well laid out by Shraddha.
    Best wishes from me to Shraddha for her next journey!
    Such competitions will definitely take you further.

    उत्तर द्याहटवा
  10. मुद्देसूद आणि नीटनेटकं लिहिलं आहे. स्पर्धेसाठी शुभेच्छा!!!

    उत्तर द्याहटवा
  11. खूप छान निबंध लिहला आहे. All the best

    उत्तर द्याहटवा
  12. खुप खुप छान....
    स्पर्धेसाठी शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  13. मुळ विषयाला धरून मुद्दे सुद मांडणी केली आहे विषयाचा अर्थ आणि भावार्थ दोन्ही लक्षात आणून दिले आहे खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  14. Bestest best essay 👍🏻👌🏻😊
    Awsm writing n impressive thoughts 👌🏻

    उत्तर द्याहटवा
  15. मोजक्या शब्दात भारताचे तीनही काळ(भूत, वर्तमान, भविष्य) मांडले.... भारी..!!!

    उत्तर द्याहटवा
  16. अतिउत्तम वर्णन ✨💯 Keep it up..All the very best ❤️

    उत्तर द्याहटवा

  17. "India is the cradle of the human race, the birthplace of human speech, the mother of history, the grandmother of legend, and the great grand mother of tradition. Our most valuable and most artistic materials in the history of man are treasured up in India only!"....🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇴🇮🇳🇮🇴🇮🇴

    उत्तर द्याहटवा
  18. खूप मस्त.....शब्दरचना...!!
    स्पर्धेसाठी शुभेच्छा......!!!

    उत्तर द्याहटवा
  19. Excellent .... khupach chann lihilay ....keep it up ..God bless you Shraddha

    उत्तर द्याहटवा
  20. खूप सुंदर लेखणी ... छान मांडणी केलीस... स्पर्धेसाठी खुप खुप शुभेच्छा श्रद्धा 💐💐

    उत्तर द्याहटवा
  21. अप्रतिम
    स्पर्धेसाठी खुप खुप शुभेच्छा श्रध्दा 🌹🌹🌹

    उत्तर द्याहटवा
  22. Glad to read your comment.This is the request that should accompany your good wishes and wishes. Thank you once again 🙏.

    उत्तर द्याहटवा
  23. खूप छान आहे असेच छान प्रयत्न करत राहा स्पर्धे साठी खूप खूप शुभेच्छा👌💐👌💐👌❤️

    उत्तर द्याहटवा
  24. दर्जेदार लेखन 👌👌स्पर्धेसाठी शुभेच्छा 👍

    उत्तर द्याहटवा
  25. खुप छान अप्रतिम व्वा व्वा अतिशय उत्कृष्ट निबंध आहे

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads