दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२
मी... रेणुका न्हिवेकर
सहभाग घेतला असून आपण माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...
स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views यावर अवलंबून आहे...
आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....
स्पर्धेची बक्षिसे :-
प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त
द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त
तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त
चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त
पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त
सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी
अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी
तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.
प्रवेश फी :- १५० रुपये फक्त
Whatsapp क्रमांक :- 8007613469
आपला नम्र
रेणुका न्हिवेकर
निबंधाचा विषय : राष्ट्रपिता महात्मा गांधी
विसाव्या शतकातील जगमान्य व्यक्ती कोण? असे विचारले असता एकमुखाने ' महात्मा गांधी' हेच नाव समोर येईल. आपले संपूर्ण आयुष्य आणि शरीर गांधीजींनी देशसेवेकरिता अर्पण केले. गांधीजींनी सत्य-अहिंसेकरिता वैयक्तिक व सामुदायिक लढा दिला. त्यात त्यांना अपयशही आले, पण प्रगतीच्या संदर्भात असे अपयश हे देखील एक यशच होते. त्यांनी जनसेवेत ईश्वरसाक्षात्कार घेण्याचा प्रयत्न केला.
एका श्रीमंत आणि नीतिसंपन्न घराण्यात गुजरात प्रांतातील पोरबंदर या गावी २ ऑक्टोबर १८६९ रोजी त्यांचा जन्म झाला. हे घराणे वैष्णव पंथीय वैश्य होते. वैष्णवांचा मेणाहून मऊपणा आणि वज्रापेक्षाही कठिणपणा यांचा सुंदर मिलाप गांधीजींच्या स्वभावात झालेला होता.
खरे पाहता बालपणी व तरुणपणी गांधीजी हजारांत सहज खपून जातील असे अगदी सर्वसाधारण होते. अभ्यासात कुशग्रता, खेळात कुशलता, निधड्या छातीची शूरता असले कोणतेही जन्मजात असामान्यत्व त्यांच्याजवळ नव्हते, पण तरीही असे काही गुण त्यांच्याजवळ होते की त्यांच्या जोरावर ते सामान्यापासून एक-एक पायरी चढत असामान्यत्वाच्या शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचले आणि महात्मा झाले.
पहिली व सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की, त्यांना आपल्या उणिवांची स्पष्ट जाणिव होती. त्या उणिवा दूर केल्या पाहिजेत असे त्यांना वाटे आणि त्याप्रमाणे ते प्रयत्नाला लागत. दुसरी गोष्ट अशी की आपल्या उणिवा कोणत्या, दोष कोणते, ते दूर करण्यासाठी कोणते प्रयत्न केले, त्यात आपण कितपत यशस्वी झालो, आपले काय चुकले या गोष्टींचा स्वतःच्या मनाशी आढावा घेऊन त्या मोकळेपणाने कबूल करण्याचे एक नैतिक धाडस त्यांच्या ठायी होते. त्यांचे तिसरे वैशिष्ट्य असे की, मोठी माणसे जे काही सांगतील ते ऐकण्याचा आणि जी-जी पुस्तके वाचली त्यांतल्या चांगल्या गोष्टींचे आचरण करण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्यापाशी वज्राची कठोरता आणि फुलाची कोमलता असे दोन्ही गुण होते म्हणूनच त्यांना 'वज्रपुष्प' हे बिरूद लावणे अचूक ठरेल.
गांधीजी संपूर्ण आयुष्यभर अत्यंत त्यागी, निरीच्छ व निर्लोभी वृत्तीने राहिले. ते असे मानीत की, "भारतातील सामान्य माणूस फार गरिबीत राहतो. मी त्यांचे प्रतिनिधित्व करतो, म्हणून मी अत्यंत साधे राहिले पाहिजे" आणि ते तसेच राहत. गांधीजींनी राजकारण, समाजकारण, धर्मकारण, आर्थिक क्षेत्र, शिक्षण, स्त्री उन्नती, जाती निर्मुलन, आहार-विहार, कुष्ठरोग निर्मूलन अश्या सर्व क्षेत्रात लीलया संचार करून सर्व बाबतींत आपले विचार व्यक्त केले आणि तसे वागून दाखवले.
वैयक्तिक जीवनात खाणे, पिणे, निसर्गोपचार अशा बाबतींत त्यांनी स्वतःवर खूप प्रयोग करून पाहिले. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, स्वदेशी, अस्पृश्यता न मानणे, निर्भयता, सर्वधर्मसमभाव ही अकरा व्रते ते निष्ठेने पाळत व इतरांनाही पाळायला लावत. गांधीजींचे साधुत्व म्हणजे पलायनवाद किंवा एकलकोंडेपणा नव्हता. सत्य-अहिंसेकचा सामुदायिक प्रयोग करणारा हा जगातला पहिला माणूस!
गांधीजी एवढ्या उंचीवर पोहोचले ते स्वप्रयत्नानेच, म्हणूनच ते कुणाचे अनुयायी नाहीत. तसेच त्यांची उंची गाठणे कुणालाच शक्य नसल्याने खऱ्या अर्थाने त्यांचा कुणीही अनुयायी नाही. सर्वसामान्य लोक व नेतेमंडळी गांधीजींपासून दूर गेले व गरज लागेल तेव्हाच त्यांनी गांधीजींना व त्यांच्या विचारांना जवळ केले. एका दृष्टीने हा गांधीजींचा आणि त्यांच्या विचारसरणीचा पराभवच होता. जगातील सर्व सात्विक प्रवृत्तीची माणसे या दृष्टीने पराभूतच झालेली आहेत. पण त्यांचा पराजय हे एका श्रेष्ठ ध्येयासाठी केलेले आत्मबलिदान आहे. कदाचित पराजयाच्या भविष्यकाली मानवजातीला अमानुषतेवर मिळणाऱ्या विजयाची ही बिजे असतील आणि असे होणे हीच महात्माजींची कमाई, हीच महात्माजींची पुण्याई!
Kup changali mahiti milali
उत्तर द्याहटवाखूप खूप आभार
हटवाखुप सुंदर..
हटवाधन्यवाद
हटवाखूपच सुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाNice 👌👌👍
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवाछान लेखन
उत्तर द्याहटवाआभारी 🙏
हटवाखूप छान लेखन
उत्तर द्याहटवाThank you so much 🙏
हटवाखूप सुंदर माहिती..👌👍
उत्तर द्याहटवाThank you ☺️
हटवा🙏🙏🙏🙏
हटवावाह रेणुका, तू मुळातच उत्तम वैचारिक प्रगल्भतेने वागतेस आणि गांधीजीं बद्दलही खूप छान लिहिले आहेस.
उत्तर द्याहटवाअसे प्रतिसादच प्रेरणा देतात. खूप खूप आभार सचिन
हटवाNice information....👍
उत्तर द्याहटवाThank you ☺️
हटवाKhup chan madam
हटवाThank you 😊
हटवाहा निबंध खरच खुप छान आहे निबंध वाचल्यावर अस वाटत की वाचतच.रहावा खुप खुप शुभेच्छा मँडम
उत्तर द्याहटवाखूप खूप आभार
हटवाखुपच सुंदर लेखन. गांधीजि बदल अजुन चांगली माहिती तुम्ही दीली.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाGreat essay. I came to know more about Mahatma Gandhiji👍👍👍
उत्तर द्याहटवाThank you so much 🙏
हटवाThank you 😊
उत्तर द्याहटवाNice 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाThank you ☺️🙏
हटवाखूप छान आणि माहितीपूर्ण
उत्तर द्याहटवाआभारी 🙏
हटवाधन्यवाद
हटवाKhup chan
हटवाThank you
हटवाSunder. Call mesege
उत्तर द्याहटवा9892008373
Thank you 🙏
हटवाखुप सुंदर....
उत्तर द्याहटवाThank you ☺️
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा👍
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवा����
उत्तर द्याहटवाकदाचित पराजयाच्या भविष्यकाली मानवजातीला अमानुषतेवर मिळणाऱ्या विजयाची ही बिजे असतील... खूप सुंदर लेखन
खूप खूप आभार 🙏
हटवाNice👍
उत्तर द्याहटवाThank you 🙏
हटवासुंदर 👌👍
उत्तर द्याहटवाआभारी 🙏
हटवाखुप छान.गांधीबदद्ल खूप माहीती मिळाली👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवा